शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या पुतळ्याची उंची सरकारकडून कमी, सर्वच समाजाच्या तोंडाला पुसली पाने: अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:50 IST

कोल्हापूर : अरबी समुद्रात राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातील छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी करून चबुतºयाची उंची वाढविण्याचे काम या सरकारने केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार अजित पवार यांनी

ठळक मुद्दे विधानसभेत एकटा जाऊन काय चुना लावू?धनंजय महाडिक अनुपस्थित.. शरद पवार पंतप्रधान.. अजित पवार मुख्यमंत्री

कोल्हापूर : अरबी समुद्रात राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातील छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी करून चबुतऱ्याची उंची वाढविण्याचे काम या सरकारने केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार अजित पवार यांनी सोमवारी येथे केला. लिंगायत, धनगर, मुस्लिम आणि मराठा समाजालाही आरक्षण देण्याची आश्वासने देणाºया सरकारने या सर्वच समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याची टीकाही आमदार पवार यांनी केली.

येथील दसरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित हल्लाबोल सभेत पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. या नाकर्त्या सरकारला घरी घालविण्याची ताकद राष्ट्रवादीत असल्याचा इशारा नेत्यांनी दिला. या हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने पक्षाने लोकसभा निवडणुकीचे प्रचाराचेच रणशिंग फुंकले. सभेस चांगली गर्दी होती व लोकांतून नेत्यांच्या भाषणाला टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला. सभेला प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार हसन मुश्रीफ, रणजितसिंह मोहिते-पाटील, आदी नेते उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘खरंतर छत्रपतींच्या स्मारकाचा व इंदू मिलच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा निर्णय आमचे सरकार सत्तेत असताना झाला होता. त्याचे श्रेय फडणवीस सरकार घेत आहे. छत्रपतींच्या स्मारकात तर सरकारने महाराजांच्या

पुतळ्याची उंची कमी करून चबुतऱ्याची उंची वाढविली आहे. नक्की किती उंची होती यासंबंधीचे पुरावे सरकारला देण्याची माझी तयारी आहे. महाराष्ट्र हा शिवरायांचा अवमान सहन करणार नाही. आंबेडकर यांच्या स्मारक कामाचे पंतप्रधान टिकाव मारून गेल्यानंतर तिकडे कोण फिरकलेले नाही. एका बाजूला आंबेडकर यांच्याबद्दल आस्था दाखविण्याचा देखावा करणाºया केंद्र सरकारमधील हेगडे नावाचा मंत्री चक्क आंबेडकर यांनी लिहिलेले संविधानच बदलण्याची भाषा करत आहे. सरकारला एवढी कसली मस्ती आली आहे आणि कसली धुंदी चढली आहे.? अशी विचारणा पवार यांनी केली.मुंडे म्हणाले,‘ राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनास राज्याच्या सर्व भागांतून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. वारे बदलत आहे. लोकांच्या मनात राज्य व केंद्र सरकारबद्दल कमालीची नाराजी आहे. समाजातील एकही घटक सरकारबद्दल समाधानी नाही. हे आंदोलन राजकीय नसून लोकांच्या प्रश्नांसाठी सरकारला जागे करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.’आमदार शिंदे म्हणाले, ‘देशाच्या राजकारणात शरद पवार हेच पुन्हा केंद्रबिंदू ठरत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राने नव्याने राष्ट्रवादीला ताकद द्यावी.’

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ‘भाजपला पराभव करण्याची शपथ घेऊनच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. हे सरकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आता क्षणभरही विश्रांती नाही.’स्वागत शहराध्यक्ष राजू लाटकर यांनी केले. सूत्रसंचालन अनिल घाटगे यांनी केले. लाटकर यांच्यासह आर. के. पोवार, आदिल फरास आदींनी सभेचे अत्यंत नेटके नियोजन केले. सभेला झालेली गर्दी पाहून नेत्यांनाही चांगलाच उत्साह संचारला.शरद पवार पंतप्रधान.. अजित पवार मुख्यमंत्रीया सभेत शरद पवार हेच पंतप्रधान व अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन सर्वच नेत्यांनी केले. देशाच्या राजकारणात शरद पवार हे केंद्रस्थानी आले आहेत. त्यांना पंतप्रधान करण्याचे स्वप्न महाराष्ट्र सन १९९९ पासून पाहत आहे. आता ती वेळ आली आहे. देशातील हुकूमशहाला बाजूला करण्याचे काम शरद पवारच करू शकतात, हा विश्वास ममता बॅनर्जीपासून अनेक नेत्यांना आहे. तेव्हा आता महाराष्ट्राने त्यांच्या नेतृत्वाला ताकद द्यावी, असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले. अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे असेल तर कोल्हापूर जिल्ह्याने राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार निवडून द्यायला हवेत, असे आवाहन करण्यात आले.विधानसभेत एकटा जाऊन काय चुना लावू?अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच एका कार्यकर्त्याने ‘एकच वादा अजितदादा’ अशी घोषणा केली. त्याचा संदर्भ घेत पवार म्हणाले, ‘अरे कसला वादा घेऊन बसला आहेस... जिल्ह्यातून आमचे फक्त दोन आमदार निवडून आले. तिकडे के. पी. पाटील यांचा पराभव तुम्ही ५० हजार मतांनी केला. मी, जयंत पाटील व वळसे पाटील सलग सहा-सहा वेळा निवडून आलो. मोदी लाट होती म्हणून ते वाहून गेले म्हणून सांगता तर आम्ही का गेलो नाही लाटेत.. आणि विधानसभेत मी एकटा जाऊन काय चुना लावू?’ अशी विचारणा पवार यांनी केली. 

धनंजय महाडिक अनुपस्थित..या सभेला पक्षाचे खासदार धनंजय महाडिक अनुपस्थित होते. लोकसभेत मोदी सरकारवर विश्वासदर्शक ठरावावर मतदान होण्याची शक्यता असल्याने शरद पवार यांनीच त्यांना सभागृहात उपस्थित राहण्याची सूचना केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी दिली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर